MR/Prabhupada 0018 - गुरू च्या कमळ पाया घट्टपणे विश्वासू



Lecture on SB 6.1.26-27 -- Philadelphia, July 12, 1975

प्रभुपाद: तर आम्ही उपाय करण्यासाठी ह्या वेळेचा वापर करावा आम्ही जीवनात वारंवार मरणोन्मुख असतो आणि पुन्हा दुसरे शरीर स्वीकारतो. तर ते त्यांना कसे कळेल जोपर्यंत ते योग्य गुरुकडे येत नाहीत? म्हणून शास्त्र, सांगते तद्-विज्ञानार्थं "जर तुम्हाला जीवनाची वास्तविक समस्या जाणून घ्यायची असेल आणि जर तुम्हाला कसे कृष्णभावनाभावित व्हावे ह्यासाठी ज्ञान हवे असेल, शाश्वत कसे व्हावे? भगवद्धामात परत, आपल्या घरी परत कसे जावे, तर त्यासाठी तुम्ही गुरूला स्वीकारलेच पाहिजे." आणि गुरु कोण आहे? ते स्पष्ट केले आहे, अत्यंत सोपी गोष्ट. गुरू कधीच कल्पना निर्माण करत नाही की " तुम्ही हे करा आणि मला पैसे द्या आणि तुम्ही सुखी व्हाल." तो गुरू नाही. ती पैसे कमवण्याची दुसरी प्रक्रिया आहे. तेव्हा इथे असे म्हटले आहे, मूढ, सगळे जण जे ह्या मुर्खांच्या नंदनवनात रहात आहेत, जसे अजामिल् स्वतःच्या कल्पना निर्माण करत होता... कोणीतरी घेतले आहे, "हे माझे कर्तव्य आहे," कुणीतरी केले ... तो एक मूर्ख आहे. आपण आपले कर्तव्य काय आहे हे गुरुंकडून जाणून घेतले पाहिजे. तुम्ही दररोज गात असतात, गुरु-मुख्-पद्म्-वाक्य​, चित्तेते कोरिया ऐक्य, आर्ना कोहिरो मने आशा. हे जीवन आहे. हे जीवन आहे. गुरू-मुख-पद... तुम्ही सद्भावपूर्ण गुरू निवडा, आणि तो जो तुम्हाला आज्ञा देतो , पालन करा. त्यानंतर तुमचे जीवन यशस्वी आहे. आर्ना कोहिरो मने आशा. तुम्ही हरामखोर, तुम्हाला दुसरी कुठलीच इच्छा नाही. तुम्ही दररोज गात नाहीत? पण तुम्हाला अर्थ समजला का? किंवा तुम्ही फक्त गात आहात? अर्थ काय आहे? कोण स्पष्ट करेल? कुणालाच माहीत नाही? होय, अर्थ काय आहे?

भक्त: माझी एकाच इच्छा आहे की माझे मन शुद्ध झाले पाहिजे माझ्या आध्यात्मिक गुरूंच्या मुखाद्वारे येणार्‍या शब्दातून. मला आणि कुठलीच इच्छा नाही पण हीच."

प्रभुपाद: ही आज्ञा आहे. गुरु-मुख्-पद्म्-वाक्य​, चित्तेते कोरिया ऐक्य. आता चित्त म्हणजे देहभान किंवा हृदय. "मी एव्हडेच केले पाहिजे, बस. माझ्या गुरुमहाराजांनी मला सांगितले; मी हे करावे." चित्तेते कोरिया ऐक्य, आर्ना कोहिरो मने आशा. म्हणून तो माझा गर्व नाही आहे, पण मी सांगू शकतो, तुमच्या माहितीसाठी, हे मी केले आहे. त्यामुळे जे काही छोटे यश माझ्या सर्व धर्मबंधूनपेक्षा मला लाभले आहे, ते ह्यामुळे आहे. माझ्याकडे क्षमता नाही आहे, पण ते मी घेतले, माझ्या गुरूंचे शब्द, जसे जीवन आणि आत्मा. तर हे वास्तविक आहे, गुरु-मुख्-पद्म्-वाक्य​, चित्तेते कोरिया ऐक्य. प्रत्येकाने ते केले पाहिजे, पण त्याने भर टाकली, फेरफार केले, तर तो संपला. भर नाही, फेरफार नाही. तुम्हाला गुरूजवळ संपर्क केला पाहिजे- गुरू म्हणजे भगवन्ताचा, श्रीकृष्णाचा प्रामाणिक सेवक आणि त्याचा शब्द झेला त्याची सेवा कशी करावी तर तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही बहाणा केलात "मी माझी गुरु पेक्षा अतिशय बुद्धिमान आहे, आणि मी कुठलाही फेरबदल किंवा फेरफार करू शकतो; तर तुम्ही संपलात. जेणेकरून फक्त आहे. आणि आता, पुढे गा.

भक्त: श्रीगुरुचरणे रति, एइसे उत्तम्-गति.

प्रभुपाद: श्रीगुरुचरणे रति, एइसे, उत्तम्-गति. जर तुम्हाला खर्या अर्थाने प्रगती करायची असेल, तर तुम्ही गुरूंच्या कमळ चरणी दृढतापुर्वक प्रामाणिक असले पाहिजे. मग?

भक्त: जे प्रसादे पूरे सर्व् आशा.

प्रभुपाद: जे प्रसादे पूरे सर्व् आशा. यस्य प्रसादात्... ही सूचना संपूर्ण वैष्णव तत्वज्ञानात आहे. तर जोपर्यंत आम्ही हे करीत नाही, आम्ही मूर्ख राहतो, आणि हे ह्या अजामिल​-उपाख्यान​ मध्ये लिहिले आहे. तर आज आम्ही हा श्लोक वाचत आहोत, स​एवं वर्तमानः अज्ञः. पुन्हा ते म्हणतात. पुन्हा व्यासदेव म्हणतात की " हा हरामखोर त्यात स्तिथ झाला होता, त्याचा पुत्र सेवेमध्ये गढून गेला होता, नारायण, नावाचा." त्याला माहीत नव्हते.... " हा मूर्ख नारायण म्हणजे काय आहे?" त्याला त्याचा मुलगा म्हणून माहीत होते. पण नारायण हे इतके क्षमाशील आहेत की कारण तो त्याच्या मुलाला सतत बोलावत होता, "नारायण, कृपया इथे ये. नारायण, कृपया हे घे," त्यामुळे श्रीकृष्ण असे समजत होते की "तो नारायण असा जप करत आहे." श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत. तो असा अर्थ घेत नव्हता की "मी नारायण कडे जात आहे." त्याला त्याचा मुलगा हवा होता कारण तो पुत्रप्रेमी होता. पण त्याला नारायण हे पवित्र नाम जप करण्याची संधी मिळाली आहे. हे चांगले नशीब आहे. त्यामुळे , या नुसार, आम्ही नाव बदलले. का? कारण प्रत्येक नावाचा अर्थ हा श्रीकृष्णांचा सेवक बनण्याचा आहे. तर उपेन्द्र सारखे. उपेन्द्र म्हणजे वामनदेव. तर तुम्ही बोलावले, "उपेन्द्र, उपेन्द्र. तेव्हा त्याचप्रमाणे, ते नाव संदर्भात घेतले जाते. जेणेकरून नंतर स्पष्ट केले जाईल.