MR/Prabhupada 0271 - श्रीकृष्णांचे नाव अच्युत आहे. त्यांचे कधीही पतन होत नाही

Revision as of 12:36, 12 August 2021 by Elad (talk | contribs) (Text replacement - "'''Lecture on BG 2.10 -- London, August 16, 1973'''" to "'''Lecture on BG 2.7 -- London, August 7, 1973'''")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.7 -- London, August 7, 1973

तर गुण सारखेच आहेत, पण मात्रा भिन्न आहे. कारण गुण समान असल्याने, देवाप्रमाणे,कृष्णाप्रमाणेच सर्व गुण आपल्यात आहेत. श्रीकृष्णांची प्रेम करायची प्रवृत्ती आहे त्याच्या हलादिनी शक्ती,राधाराणी बरोबर. त्याचप्रमाणे, कारण आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत, आपली पण प्रेम करण्याची प्रवृत्ती आहे. तर हा स्वभाव आहे. पण जेव्हा आपण या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो… श्रीकृष्ण भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येत नाहीत. म्हणून, श्रीकृष्णांचे नाव अच्युत आहे. त्यांचे कधी पतन होत नाही. पण आपली पतन होण्याची वृत्ती आहे.अंतर्गत… प्रकृतेः क्रियमाणानि आपण आता प्रकृतीच्या प्रभावा खाली आहोत. प्रकृतेः क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वशः (भ गी ३।२७) जेव्हा आपण प्रकृतीच्या प्रभावाखाली येतो,भौतिक प्रकृती, ज्याचा अर्थ… प्रकृतीचे तीन गुण सत्व,रज आणि तम तर आपण यापैकी एक गुण काबिज करतो. हे कारण आहे. कारणं गुणसङ् गोsस्य (भ गी १३।२२) । गुणसङ् ग. म्हणजे वेगवेगळ्या गुणांशी जोडले जाणे. गुणसङ् गोsस्य जीवस्य. जीवांचे. ते कारण आहे. एखादा विचारेल; "जर जीव भगवंताप्रमाणेच चांगले आहेत. तर का एक जीव कुत्रा होतो आणि एक जीव देव ,ब्रह्म?" आता याला उत्तर कारणं आहे. हेतू आहे गुणसङ् गोsस्य. अस्य जिवस्य गुण-संग. कारण तो एखाद्या विशिष्ट गुणाच्या संगात आहे. सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर या गोष्टींचे अतिशय स्पष्ट वर्णन उपनिषदात केले आहे. अग्नीप्रमाणे. तिथे ठिणगी असते. काहीवेळा अग्नीतून ठिणगी खाली पडते. आता अग्नीतून ठिणगी खाली पडण्याच्या तीन अवस्था आहेत. जर ठिणगी सुक्या गवतावर पडली,तर लगेच गवत,सुके गवत पेटू शकते. जर ठिणगी सामान्य गवतावर पडली,तर ते पेटायला वेळ लागेल,मग परत ती विझेल. पण जर ठिणगी पाण्यावर पडली,लगेच विझेल,अग्नीचा गुणधर्म. तर जे सत्वगुणाने बांधले गेले आहेत,सत्वगुण,ते बुद्धिमान आहेत. त्याना ज्ञान प्राप्त झाले आहे. ब्रम्हाप्रमाणे. आणि जे रजोगुणाने बांधले गेले आहेत, ते भौतिक कार्यात व्यग्र आहेत. आणि जे तमोगुणाने बांधले गेले आहेत,ते आळशी आणि झोपाळू आहेत. एवढेच. हि तमोगुणाची लक्षण आहेत. तमोगुण म्हणजे ते आळशी आणि झोपाळू असतात. रजोगुण म्हणजे खूप सक्रिय,पण सक्रिय माकडाप्रमाणे. ज्याप्रमाणे माकड खुप सक्रिय असते,पण ते सर्व धोकादायक आहेत. लवकरच… माकड,आपण कधीही निष्क्रिय पाहणार नाही. जेव्हा ते खाली बसेल,ते "गट गट गट गट "आवाज करेल.