MR/Prabhupada 0230 - वैदिक संस्कृतीनुसार, समाजाचे चार विभाग आहेत: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0230 - in all Languages Category:MR-Quotes - 1974 Category:MR-Quotes - L...")
 
No edit summary
 
Line 7: Line 7:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0229 - मी पाहू इच्छितो की एका शिष्याने श्रीकृष्ण तत्वज्ञान जाणले आहे|0229|MR/Prabhupada 0231 - भगवान म्हणजे जो संपूर्ण विश्वाचा मालक आहे|0231}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0229 - |0229|MR/Prabhupada 0231 - |0231}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 19: Line 17:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|tV7OmtTfEXw|वैदिक संस्कृतीनुसार, समाजाचे चार विभाग आहेत - Prabhupāda 0230}}
{{youtube_right|tV7OmtTfEXw|वैदिक संस्कृतीनुसार, समाजाचे चार विभाग आहेत<br/> - Prabhupāda 0230}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 11:45, 1 June 2021



Lecture on BG 2.1-5 -- Germany, June 16, 1974

कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर हि चर्चा अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये झाली. तर चर्चेचा विषय असा होता की जरी युद्धाची घोषणा झाली असली तरी, अर्जुन, जेव्हा त्याला प्रत्यक्षात समजले की "विरुद्ध बाजूला माझे अनेक नातलग आहेत," तो कसा त्यांची हत्या करू शकत होता? कृष्ण सल्ला देतात की "प्रत्येकाने आपले निर्धारित कर्तव्य बजावावे वैयक्तिक फायदा आणि तोटा याचा विचार न करता." वैदिक संस्कृतीनुसार, समाजाचे चार विभाग आहेत. संपूर्ण जगात सगळीकडे हे चार विभाग आहेत. हे नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या शरीराने शिकू शकतो, डोके आहे, हात आहे, पोट आहे, आणि पाय आहेत. त्याचप्रमाणे, समाजात असा एक पुरुषांचा वर्ग असला पाहिजे ज्याला मस्तक म्हणून मानले पाहिजे. दुसरा पुरुषांचा वर्ग असला पाहिजे जो समाजाचे संकटांपासून रक्षण करेल, दुसरा पुरुषांचा वर्ग धान्य पिकवण्यामध्ये कुशल असेल. आणि गायीला संरक्षण देईल आणि व्यापार करेल.

तर… आणि उरलेला पुरुषांचा वर्ग, जो मस्तक म्हणून काम करीत नाही, ना संकटांपासून रक्षण करतो, ते अन्नधान्य पिकवू शकत नाहीत किंवा गायींना संरक्षण देऊ शकत नाहीत, त्यांना शूद्र म्हणतात: जसे आपण टाळू शकत नाही, आपले शरीर पूर्ण करण्यासाठी, मस्तकाचा विभाग, हाताचा विभाग, पोटाचा विभाग आणि चालणे किंवा काम करणारा विभाग. तर अर्जुन पुरुषांच्या वर्गाचा घटक होता जो समाजाला संरक्षण देण्याचा होता. तर जेव्हा तो लढण्यासाठी नकार देत होता, अर्जुन, जेव्हा तो लढण्यासाठी नकार देत होता, त्या वेळेला श्रीकृष्णांनी त्याला सल्ला दिला की " युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे."

तर सर्वसाधारणपणे हत्या करणे चांगले नाही, पण जेव्हा शत्रू असतो, आक्रमक असतो, मग आक्रमण करणाऱ्याची हत्या करणे पाप नाही. तर करुक्षेत्रावरच्या युद्धभूमीवरील दुसरा पक्ष, ते अर्जुनाच्या पक्षावर आक्रमक बनले. आता, हि भगवद् गीतेची रचना आहे. वास्तविक हेतू अर्जुनाला आध्यात्मिक समजेविषयी शिकवण्याचा आहे. तर आध्यात्मिक समज म्हणजे सर्वप्रथम आत्मा काय आहे जाणणे होय. जर तुम्हाला माहित नाही आत्मा काय आहे, तर आध्यात्मिक समज कुठे आहे? लोक खूपच शरीरिक जाणिवेत गुंतलेले आहेत. त्याला भौतिकता म्हणतात. पण जेव्हा तुम्ही जाणता आत्मा काय आहे आणि त्याप्रमाणे वागता, त्याला आध्यात्मवाद म्हणतात.

तर अर्जुन विरुद्ध पक्षाबरोबर लढण्यासाठी संकोच करीत होता कारण त्यांच्याबरोबर त्याचे रक्ताचे नातेसंबंध होते. तर अर्जुन आणि कृष्ण यांच्यामध्ये चर्चा होती, पण ती मैत्रीपूर्ण चर्चा होती. म्हणून, जेव्हा अर्जुनाला समजले की केवळ मैत्रीपूर्ण चर्चेने समस्येचे समाधान होणार नाही, तो त्यांचा शिष्य बनला. अर्जुन कृष्ण यांना शरण गेला, शिष्यस्तेऽहं शाधि मां प्रपन्नम् (भ.गी. २.७) "माझ्या प्रिय कृष्ण, आतापर्यंत आपण मित्राप्रमाणे बोलत आहोत. आता मी तुमचा नियमित शिष्य बनलो आहे. कृपया मला उपदेश देऊन वाचावा. मी काय करायला हवे?" म्हणून जेव्हा हि स्थिती आली, कृष्ण अर्जुनाला खालीलप्रमाणे सल्ला देत आहेत. श्रीभगवान उवाच आता,

इथे सांगितले आहे… अर्जुनाला कोण सांगत आहे? भगवद् गीतेचा लेखक किंवा संपादक… भगवद् गीता श्रीकृष्णांनी सांगितली आहे. ती श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील चर्चा आहे, आणि ती व्यासदेवद्वारा नोंदवली आहे, आणि नंतर त्याचे पुस्तक बनले. ज्याप्रमाणे जेव्हा पण बोलतो ते नोंदवले जाते आणि नंतर ते पुस्तक म्हणून प्रकाशित केले जाते. म्हणून या पुस्तकात असे सांगितले आहे, भगवान उवाच. व्यासदेव लेखक आहेत. ते असे म्हणत नाहीत की, "मी बोललो आहे." ते म्हणतात, भगवान उवाच - "आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी सांगितले."