MR/Prabhupada 0431 - देव हा सर्व जिवंत घटकांचा खरोखर परिपूर्ण मित्र आहे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0431 - in all Languages Category:MR-Quotes - 1972 Category:MR-Quotes - L...")
 
(Vanibot #0005: NavigationArranger - update old navigation bars (prev/next) to reflect new neighboring items)
 
Line 7: Line 7:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|English|Prabhupada 0430 - Caitanya Mahaprabhu Says That Each and Every Name of God is as Powerful as God|0430|Prabhupada 0432 - As Long As You Are Reading, The Sun Is Unable To Take Your Life|0432}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0430 - चैतन्य महाप्रभु म्हणतात की देवाचे प्रत्येक नांव देवासारखे शक्तिशाली आहे|0430|MR/Prabhupada 0432 - जोपर्यंत आपण वाचत आहात तोपर्यंत सूर्य आपला जीव घेण्यास असमर्थ आहे|0432}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->

Latest revision as of 07:12, 13 July 2021



Lecture on BG 2.11 -- Edinburgh, July 16, 1972

आनंदासाठी, समजण्यासाठी तीन गोष्टी आहेत. भगवद गीतेत असे सांगितले आहे.

भोक्तारं यज्ञतपसां
सर्वलोकमहेश्वरम्।
सुहृदं सर्वभूतानां
ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति
(॥ ५-२९॥)

आपल्याला फक्त तीन गोष्टी समजल्या पाहिजेत तर आपण शांततामय व्हाल. ते काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे "देव आनंद घेणारा आहे, मी आनंद घेणारा नाही." पण इथे आपली चूक आहे, प्रत्येकजण विचार करत आहे, "मी आनंद घेणारा आहे, " पण प्रत्यक्षात आपण आनंद घेत नाही. उदाहरणार्थ, कारण मी देवाचा भाग आणि त्याचाच आहे ... जसे माझा हात हा माझ्या शरीराचाच भाग आहे. समजा हाताने एक छान फळांचा केक पकडला आहे, मोहक केक आहे. हात त्याचा आनंद घेऊ शकत नाही. हात तो उचलतो आणि तोंडात ठेवतो आणि जेव्हा ते पोटात जाते, जेव्हा ते अन्न खाऊन उर्जा निर्माण होते, तेव्हा त्या हाताने आनंद घेतला जातो. केवळ या हातानेच नाही - हा हात देखील, डोळे देखील, पाय देखील. त्याचप्रमाणे आपण कोणत्याही गोष्टीचा आनंद थेट घेऊ शकत नाही. जर आपण सर्व काही देवाच्या उपभोगासाठी ठेवले आणि मग आपण घेतो, त्या आनंदात सहभागी व्हा, हेच आपले आरोग्यदायी जीवन आहे. हे तत्वज्ञान आहे. आम्ही काहीही घेऊ शकतच नाही. भगवत्प्रसादम् भगवत्प्रसादम् . आमचे तत्वज्ञान आहे की आम्ही छान खाद्य पदार्थ तयार करतो आणि आम्ही श्रीकृष्णाला देतो, आणि श्रीकृष्णांनी खाल्ल्यानंतर, मग आपण ते घेऊ. तेच आमचे तत्वज्ञान. श्रीकृष्णांना दिल्याशीवाय कोणतीही वस्तू आम्ही घेत नाही. म्हणून आम्ही देव सर्वोच्च आनंद उपभोक्ता आहेत ,असे म्हणत आहोत. आम्ही आनंददायक नाही. आम्ही सर्व श्रीकृष्णांच्या अधीनस्थ आहोत म्हणून , .... भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् (॥ ५-२९॥)। आणि देव सर्व गोष्टींचा मालक आहे. ती वस्तुस्थिती आहे समजा इतका मोठा महासागर, आपण त्याचे मालक आहात? आम्ही दावा करीत आहोत की मी या भूमीचा किंवा या समुद्राचा मालक आहे. पण प्रत्यक्षात, माझ्या जन्मापूर्वी, समुद्र तिथे होता, जमीन होती, आणि माझ्या मृत्यू नंतर, समुद्र तेथे असेल, जमीन तेथे असेल मी मालक होईल तेव्हा?जसे. या खोली मध्ये आम्ही या खोली मध्ये प्रवेश करण्यापूर्वी खोली अस्तित्त्वात होती, आणि जेव्हा आपण हा खोली सोडेल तेव्हा खोली अस्तित्वात असेल. मग केव्हा आपण मालक होतो? जर आपण येथे एक तास किंवा अर्धा तास बसून राहण्याने आपण मालक झालो असा खोटा दावा केला तर , हा चुकीचा भ्रम आहे. म्हणून एखाद्याने हे समजले पाहिजे की आम्ही मालक हि नाही किंवा आनंद घेणारे नाही. . भोक्तारं यज्ञ.......देव आनंद घेणारा आहे. आणि देव मालक आहे. सर्वलोकमहेश्वरम् । आणी.. सुहृदं सर्वभूतानां....... (॥ ५-२९॥) तो प्रत्येकाचा सर्वात चांगला मित्र आहे. तो केवळ मानवी समाजाचा मित्र नाही. तो प्राणी समाजाचा मित्र आहे. कारण प्रत्येक जिवंत वस्तू देवाचा पुत्र आहे. आपण कसे अन्यथा एखाद्या प्रकारे माणसाशी आणि इतर प्रकारे पशूशी वागू शकतो? नाही देव खरोखरच सर्व जिवंत घटकांचा परिपूर्ण मित्र आहे. जर आपल्याला या तीन गोष्टी सहज समजल्या गेल्या तर आपण त्वरित शांततामय बनू.

भोक्तारं यज्ञतपसां
सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां
ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति
(॥ ५-२९॥)

ही शांतीची प्रक्रिया आहे. आपण स्थापित करू शकत नाही ... आपण "मी देवाचा एकुलता एक मुलगा आहे असे आपल्याला वाटत असल्यास, आणि प्राणी हा आत्मा नाही, आणि आपण त्याला मारू या, "हे फार चांगले तत्वज्ञान नाही. का नाही? आत्म्याला धारण करण्याची कोणती लक्षणे आहेत? आत्म्याला धारण करण्याची तीच चार लक्षणे आहेतः खाणे, झोपणे, जन्म देणे आणि बचाव करणे. प्राणी देखील या चार गोष्टींमध्ये व्यस्त आहेत; आम्ही पण या चार गोष्टींमध्ये व्यस्त आहोत मग प्राणी आणि माझ्यात फरक कुठे आहे?

म्हणून वैदिक साहित्याच्या तत्वज्ञानात प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिलेली आहे, विशेषत: - भ॔॔गवद्गीता जशी आहे तशी॔ मधे त्यांचे सारांश दिले आहे. तर आमची एकच विनंती आहे की तुम्ही देवाची जाणीव करून घ्या. ही एकच संधी आहे. मानवी जीवनाची ही एकमेव संधी आहे की देव काय आहे हे समजून घेण्याची, मी काय आहे, देवाशी माझे काय नाते आहे? प्राणी - आम्ही या सभेमध्ये मांजरी आणि कुत्र्यांना आमंत्रित करू शकत नाही. ते शक्य नाही. आम्ही मानवांना आमंत्रित केले आहे, कारण ते समजू शकतात. म्हणून मानवाकडे पूर्वग्रह आहे , समजूतदारपणा प्राप्त झाले आहे. दुर्लभम् मन्नुष्य जन्म ।.. म्हणूनच त्याला दुर्लभ म्हणतात, मन्नुष्य जन्म फारच दुर्मिळ असून तो आपल्याला मिळाला आहे. जर आपण "देव काय आहे," या प्रकारात समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर मग मी काय, आमचे नातं काय आहे, "मग आपण आत्महत्या करत आहोत. कारण या आयुष्यानंतर, मी या देहाचा त्याग करताच, मला दुसरे शरीर स्वीकारावे लागेल. आणि मी कोणत्या प्रकारचे शरीर स्वीकारणार आहे हे आम्हाला ठाऊक नाही. ते माझ्या हातात नाही. "पुढच्या आयुष्याने मला राजा बनवा" अशी मागणी आपण करू शकत नाही. ते शक्य नाही. आपण खरोखर राजा होण्यासाठी पात्र असल्यास, निसर्ग आपल्याला राजाच्या घरात एक शरीर देईल. तु ते करू शकत नाहीस. म्हणूनच आपल्याला पुढील, चांगले शरीर मिळविण्यासाठी कार्य करावे लागेल. भगवद गीतेमध्येही हे स्पष्ट केले आहे:

यान्ति देवव्रता देवा
न्पितॄन्यान्ति पितृव्रताः ।
भूतानि यान्ति भूतेज्या
यान्ति मद्याजिनोऽपि माम्
(॥ ९-२५॥)

तर जर आपण स्वत: ला पुढच्या शरीरासाठी या जीवनात तयार करायचे असेल तर स्वत: ला पुन्हा शरीराबरोबर घरी, देवतेकडे परत तयार का करू नये. ही का चेतना चळवळ आहे. आपण प्रत्येक माणसाला स्वत: ला कसे तयार करावे हे शिकवत आहोत जेणेकरून हे शरीर सोडल्यानंतर, तो थेट देवाकडे जाऊ शकेल. घरी परत, देवतेकडे परत. भगवद गीतेमध्ये असे सांगितले आहे. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन (॥ ४-९॥) त्यक्त्वा देहं ,हे सोडल्यानंतर ... आपण सोडून द्यावे लागेल. मला हा देह सोडून देणे आवडत नाही, परंतु मला ते करावे लागेल. हा निसर्गाचा नियम आहे. "मृत्यू प्रमाणे नक्की." मृत्यू होण्यापूर्वी, आपण स्वतःला तयार केले पाहिजे, पुढील शरीर म्हणजे काय. जर आपण ते करत नाही तर आपण आत्महत्या करीत आहोत. तर ही का चेतना चळवळ मानवांना वाचवण्यासाठी आहे जीवनाच्या शारीरिक संकल्पनेच्या चुकीच्या संकल्पनेमुळे गंभीर जखमी होण्यापासून. आणि सोपी पद्धत म्हणजे सोळा शब्दांचा जप करणे किंवा आपण तत्त्वज्ञ असल्यास, आपण वैज्ञानिक असल्यास, आपणास सर्व काही शास्त्रीयदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या जाणून घ्यायचे असल्यास आपल्यासारखी मोठी, मोठी पुस्तके मिळाली आहेत. आपण एकतर पुस्तके वाचू शकता किंवा आमच्याबरोबर सामील होऊ शकता आणि हरे कृष्ण..मंत्राचा जप करू शकतात

खूप खूप धन्यवाद