MR/Prabhupada 1077 - भगवंत परिपूर्ण असल्याने त्यांच्यात आणि त्यांच्या नावात काहीच फरक नाही आहे



660219-20 - Lecture BG Introduction - New York


भगवान परिपूर्ण आहेत , त्याच्या नावामध्ये आणि त्याच्यामध्ये कोणताही फरक नाही श्रीमद -भागवत ला भाष्यो अयं ब्रह्म सूत्रानां असे म्हणतात . हि वेदान्ता-सूत्रची नैसर्गिक टिप्पणी आहे . तर हे सर्व साहित्य, जर आपण आपल्या विचारांचे हस्तांतरण केले,तद भाव भावित: सदा . सदा तद भाव भावित: (भ गी ८।६) . जो नेहमी गुंतलेला असतो ... जसे भौतिक मनुष्य नेहमी भौतिक साहित्य वाचण्यात गुंतलेला असतो , जसे वृत्तपत्रे, मासिके आणि कथा , कादंबरी इत्यादी , या विविध स्तरावरच्या विचारांच्या गोष्टी. जर आपण वैदिक वाचवण्याद्वारे, वैदिक साहित्य वाचन करण्याची क्षमता, जसे दयाळू वेद व्यासांनी सांगितल्याप्रमाणे , तर मग आपल्या मृत्युच्या वेळी परमेश्वराचे स्मरण होणे शक्य आहे. भगवंताने स्वत: सुचवलेला एकमेव मार्ग आहे. सूचित नाही, ते खरंच आहे .

नास्त्यत्र संशय: (भ गी ८।५) .निःसंशयपणे याबद्दल यात काही शंका नाही. तस्मात , म्हणून भगवंतांनी सुचविले,
तस्मात सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च (भ गी ८।७)


तो अर्जुनाला सल्ला देतो की, माम् अनुस्मर युध्य च . तो असे म्हणत नाही की "तू माझे स्मरण ठेव आणि तुझे सध्याचे व्यावसायिक कर्तव्य सोडून दे." नाही. तसे सुचवलेले नाही . भगवंत कधीही अव्यवहार्य सुचवत नाहीत . हे भौतिक जग, हे भौतिक शरीर सांभाळण्यासाठी प्रत्येकाला काम करावे लागते. चार सामाजिक विभागांमध्ये काम विभागले आहे: ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र . समाजातील बुद्धीमान वर्ग, ते वेगळ्या मार्गाने काम करत आहेत , आणि प्रशासक वर्गवारी वेगळ्या पद्धतीने काम करीत आहेत , व्यापारी समाज, उत्पादक समाज, ते वेगळ्या प्रकारे काम करत आहेत , आणि कामगार वर्ग ते देखील वेगळ्या प्रकारे काम करीत आहेत. मानवी समाजात एकतर कामगार म्हणून किंवा उद्योजक म्हणून, किंवा राजकारणी, प्रशासक म्हणून किंवा साहित्यिक कारकीर्दीतील बुद्धिमान वर्गाच्या उच्चतम वर्गाच्या म्हणून, वैज्ञानिक शोध , प्रत्येकजण काही कामात गुंतला आहे, आणि प्रत्येकाला काम करणे, अस्तित्वासाठी संघर्ष करणे गरजेचे आहे . म्हणूनच भगवंत सांगतात , "आपल्याला आपला व्यवसाय सोडण्याची गरज नाही, परंतु त्याच वेळी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता ,

माम् अनुस्मर (भ गी ८।७) । ज्यामुळे मृत्यूच्या वेळी माझी आठवण होण्यास तुम्हाला मदत होईल . जर तुम्ही नेहमी मला आठवणीत नाही ठेवू शकलात , तुमच्या अस्तित्वसाठीच्या संघर्षात सुद्धा तर ते शक्य नाही. "ते शक्य नाही . भगवान चैतन्यांनी सुद्धा तीच गोष्ट सुचवली आहे ,

कीर्तनीय: सदा हरी (चै च अादि १७।३१) . कीर्तनीय: सदा ।प्रत्येकाने नेहमीच भगवंताचे नाव घेण्याचा सर्व केला पाहिजे . परमेश्वराचे नाव आणि परमेश्वर वेगळे नाहीत. तर इथे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला सूचना दिली की माम् अनुस्मर (भ गी ८।७) "तू फक्त माझे स्मरण कर" , आणि भगवान चैतन्य म्हणतात, "आपण नेहमीच कृष्णाचे नाम जपा " . इथे कृष्ण सांगतो तू नेहमीच माझे स्मरण कर किंवा कृष्णाचे स्मरण कर , आणि भगवान चैतन्य म्हणतात, " तुम्ही नित्य कृष्णाचे नाम जपा " . आणि तिथे काहीच फरक नाही आहे कारण कृष्ण आणि कृष्णाच्या नावात काहीच फरक नाही आहे . परिपूर्ण स्थितीमध्ये तिथे काहीच फरक नाही आहे . ही परिपूर्ण स्थिती आहे, भगवंत परिपूर्ण असल्याकारणाने , त्याचे नाव आणि त्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे . तर आपल्याला तसा सर्व केला पाहिजे ,

तस्मात सर्वेषु कालेषु (भ गी ८।७) . नेहमी , चौवीस तास , आपल्याला आपल्या आयुष्यातल्या गतिविधी त्याप्रमाणे वळवल्या पाहिजेत अशा प्रकारे कि आपण त्याला चौवीस तास स्मरण करू शकू . हे कसे शक्य आहे? होय, शक्य आहे. हे शक्य आहे. या संबंधात आचाऱ्यांनी एक अत्यंत क्रूर उदाहरण मांडले आहे आणि हे उदाहरण काय आहे? असे म्हटले जाते की एक स्त्री जी दुसर्या पुरुषाशी संलग्न आहे , जरी तिला पती आहे, तरीही, ती दुसऱ्या माणसाशी संलग्न आहे. आणि अशा प्रकारचे जोड फार मजबूत होते. याला परकीय रस म्हणतात . स्त्री किंवा पुरुषाच्या बाबतीत . जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या बायकोशिवाय दुसरया स्त्रीविषयी आवड आहे, किंवा एखाद्या स्त्रीला आपल्या पती व्यतिरिक्त दुसर्या माणसाची आवड आहे, असा संबंध फार मजबूत आहे. हे उदाहरण एका वाईट चरित्राची स्त्री म्हणून दिले जिला दुस-याच्या पतीविषयी आसक्ती आहे, ती नेहमी विचार करते, त्याच वेळी तिच्या पतीला दाखवते की ती आपल्या कौटुंबिक घडामोडींमध्ये खूप व्यस्त आहे, त्यामुळे तिचा पती तिच्यावर संशय घेऊ शकणार नाही. म्हणूनच ती नेहमी आपल्या प्रियकरा सोबतची रात्रीची वेळ आठवत आहे घरातील सर्व कार्य अगदी छान पार पडतानासुद्धा ,


त्याचप्रमाणे एखाद्याने आपले परम पती श्री कृष्ण यांचे स्मरण करावे , आपली भौतिक कर्मे योग्य रीतीने पार पडताना सुद्धा . हे शक्य आहे. त्यासाठी एक मजबूत, खोल प्रेम भावना असणे आवश्यक आहे..